Sunday, November 16, 2025

समजदार होऊ या

जगात चांगल्या विचारांची खूप लोक आहेत, त्यामानाने षडयंत्त्री लोक कमी आहेत पण ती पटकन एक होतात, मात्र चांगल्या विचाराची लोकं एकमेकांच्या त्रुटी दाखवण्यात व्यस्त असतात. 
चांगल्या विचारांच्या लोकांनी चांगल्या कामांसाठी एकत्र यावं, एकमेकांना आधार द्यावा अन् जगात चांगुलपणा वाढवावा हे गरजेचं आहे. 
सगळ्याच क्षेत्रातील चांगल्या विचारांच्या लोकांना एकमेकांशी जोडून घेण्याचा विचार अक्षर मानव घेऊन पुढे येत आहे. 
छोटे छोटे मुद्दे उगाच मोठ्या उद्दिष्टांपासून आपल्याला दूर करतात. 
समजदार होऊ या 👍

भाजपचं अभिनंदन | Congratulations to BJP

आत्ताच ज्येष्ठ साहित्यिक, अक्षर मानव चळवळीचे मेंटॉर राजन खान गुरुजींचा व्हिडिओ बघितला. या व्हिडिओमध्ये ते भारताच्या ...